31 जुलैपर्यंत महागाई भत्ता वाढीची होऊ शकते घोषणा
। मुंबई । प्रतिनिधी ।
अखेर केंद्रीय कर्मचार्यांची प्रतीक्षा संपली. आता लवकरच कर्मचार्यांच्या पगारात 40 हजार रुपयांनी वाढ होणार आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारीवरून कर्मचार्यांच्या डीएमध्ये वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एआयसीपीआयच्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, 6 टक्के महागाई भत्ता वाढीवरून पडदा उचलण्यात आला आहे. आता 3 ऑगस्ट रोजी होणार्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीची घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
फेब्रुवारीपासून एआयसीपीआय निर्देशांकाचा डेटा सातत्याने वाढत आहे. मे महिन्याची आकडेवारी समोर आली आहे, त्यामुळे जुलैमध्ये महागाई भत्त्यात किमान 6 टक्के वाढ होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. एप्रिलनंतर मे महिन्याच्या एआयसीपीआय निर्देशांकात मोठी झेप वाढ झाली आहे. यावेळी त्यात 1.3 अंकांची वाढ होऊन ती 129 अंकांवर पोहोचली आहे. आणि आता जूनमध्ये जरी हा आकडा वाढला नसला तरी 6 टक्के महागाई भत्त्यात वाढ होईल यात शंका नाही. म्हणजेच एकंदरीत एआयसीपीआय निर्देशांक जूनमध्ये घसरला नाही, तर तो 6 टक्के वाढण्याची खात्री आहे.
31 जुलैपर्यंत महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाऊ शकते. म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पगारात यावेळी बंपर वाढ होण्याची अपेक्षा कर्मचार्यांना आहे.