नाताळाच्या सुट्टीत जलपर्यटनाकडे पाठ
। उरण । वार्ताहर ।
नाताळाच्या सुट्टीत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देश-विदेशातील हजारो पर्यटकांची पावले ही कोकण किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद लुटण्याकडे व मुंबई शहर तसेच जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी वळतात. मात्र, नुकतेच (दि.18) घारापुरी बेटाकडे प्रवाशांना घेऊन जाणार्या निलकमळ या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे नाताळाच्या सुट्टीत या दुर्घटनेचा फटका हा अलिबाग, मांडवा बंदर आणि घारापुरी बेटाकडे जाणार्या जलपर्यटनाला बसला असून, स्थानिक व्यावसायिक आणि बोट चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यात घारापुरी बेट उर्फ लेण्यांचे शहर म्हणून घारापुरी (एलिफंटा) बेटानी आपल्या नावाची ओळख ही देश-विदेशातील हजारो पर्यटकांच्या हृदयात निर्माण केली आहे. त्यामुळे मुंबई, कोकण किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणारे हजारो पर्यटकांची पावले ही दरदिवशी आपापल्या कुटुंबासह घारापुरी बेटावर वळतात. याचा फायदा हा कोकणातील, घारापुरी बेटावरील गोरगरीब व्यावसायिकांना तसेच बोट चालकांना होत असतो. मात्र, बुधवारी (दि. 18) मुंबई शहरातून घारापुरी बेटाकडे प्रवाशांना घेऊन जाणार्या निलकमळ या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे नाताळाच्या सुट्टीत या दुर्घटनेचा फटका हा अलिबाग, मांडवा बंदर आणि घारापुरी बेटाकडे जाणार्या जलपर्यटनाला बसला असून, स्थानिक व्यावसायिक आणि बोट चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बोट दुर्घटनेमुळे आम्ही कुटुंब घाबरून न जाता नाताळाच्या सुट्टीत मुंबई शहर व घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी आलो आहोत. परंतु, अशा दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने, बोट चालकांनी खबरदारी घेऊन शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. घारापुरी बेटावरील लेणी येथील निसर्गसौंदर्याचा आनंद वेगळाच अनुभवास मिळत आहे.
– समीर पाटील, ठाणे
बोट दुर्घटनेचा फटका काही अंशी स्थानिक व्यावसायिकांना बसला असला तरी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षात निश्चित हजारो पर्यटकांची पावले ही घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी व येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी ये-जा करतील. त्यांच्या स्वागतासाठी आज आणि उद्याही घारापुरी ग्रामपंचायत व ग्रामस्थ एकदिलाने पुढाकार घेतील.
– बळीराम ठाकूर, उपसरपंच, घारापुरी
