उपाययोजना करण्याची मागणी
। रसायनी । वार्ताहर ।
पनवेल ते पळस्पे दरम्यान असणारा काळुंद्रें येथील रेल्वे पुलाखाली सखोल भाग असल्याने गटारातील पाणी पूर्णपणे रस्त्यावर जमा होते. परिणामी राष्ट्रीय महामार्ग एनएच-48 मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक ठप्प होत असल्याने लांबलचक वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे या वाहतुक कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
काळुंद्रे पुलाखाली सखोल भाग असल्याने गटारातील पाणी रस्त्यावर जमा होत असल्याने येथे प्रवास करणार्या जनतेला याचा नाहक त्रास हसन करावा लागत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे येथे वारंवार वाहतुक कोंडी होते. या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्यावतीने केंद्रिय रेल्वे सल्लागार समिती सदस्य भारत सरकार अभिजित पाटील यांना रसायनी येथील पदाधिकार्यांनी निवेदन देऊन सदर समस्या सोडविण्यासाठी मागणी केली आहे. यावेळी सुदाम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव, गणेश थोरवे पश्चिम महाराष्ट्र सचिव, पोलीस सेवा संघटना, सागर कुरंगळे रायगड जिल्हा उपाध्यक्ष, पोलीस सेवा संघटना हे मान्यवर उपस्थित होते.






