पुलवामा हल्ला शहिदांना आदरांजली

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामा येथे झालेल्या हल्लयातील शहिदांना सोमवारी देशवासियांच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली.या घटनेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे. शहीद झालेल्या जवानां आदरांजली वाहतो. त्यांचे सेवा आणि बलिदान देश कधीच विसरणार नाही. त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाने सर्वांना प्रेरणाना मिळेल आणि प्रत्येक भारतीय देशाला अधिक बळकट आणि समृद्ध करेल, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

Exit mobile version