विजेचा धक्क्यात दोघांचा मृत्यू

| मुंबई | प्रतिनिधी ।

लालबाग-काळाचौकी परिसरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविकांची अलोट गर्दी उसळलेली असतानाच रविवारी पहाटेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. काळाचौकी येथील ‌‘महागणपती उत्सव मंडळ‌’ परिसरात पिण्याच्या पाण्याच्या तात्पुरत्या स्टॉलवर अचानक विद्युत प्रवाह उतरला. यावेळी पाणी पिण्यासाठी आलेल्या आठ वर्षांच्या चिमुकलीसह 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, अन्य चार जण जखमी झाले आहेत. विद्युत प्रवाह पसरल्याचे लक्षात येताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने मुख्य वीजपुरवठा खंडित केला आणि सावधगिरीचा उपाय म्हणून तो संपूर्ण परिसर सील केला. स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version