कातकरवाडीतील दोन घरे कोसळली

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील उद्धर कातकरवाडी येथील दोन घरे कोसळली आहेत. त्यामुळे येथील आदिवासींचा संसार उघड्यावर पडला आहे. येथील श्री रामेश्वर देवस्थान उद्धर व ग्रामस्थांतर्फे या लोकांना मदत मिळत आहे. मात्र शासनाकडून अजूनही कोणतीच मदत मिळालेली नाही. अनिल वाघमारे यांचे घर 29 जुलै रोजी पडले, तर काशीराम हीलम यांचे घर 7 जून रोजी पडले. इतके दिवस उलटून देखील अजूनही शासनातर्फे या कुटुंबियांना कोणतीही प्राथमिक मदत मिळालेली नाही. मग उद्धर ग्रामस्थांनी श्री रामेश्वर देवस्थान कडून भांडी, कपडे, छत्र्या व टॉवेल या वस्तू दिल्या आहेत. तसेच रविवारी (दि.6) दोन्ही कुटुंबांना पाच ते सहा हजाराचे जीवनावश्यक साहित्य वाटप केले आहे. असे ग्रामस्थ प्रमोद लांगी यांनी सांगितले. नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून तातडीची मदत मिळणे आवश्यक होते. असे देखील प्रमोद लांगी यांनी सांगितले.

Exit mobile version