अल्टीमेट टेबल टेनिस नव्या रुपात

या हंगामात 8 संघ जेतेपदासाठी भिडणार

| चेन्नई | वृत्तसंस्था |

भारताची प्रमुख टेबल टेनिस लीग, अल्टिमेट टेबल टेनिस 2 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत चेन्नई येथे खेळवली जाणार आहे. अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आकर्षित करणारी आणि भारतीय पॅडलर्सच्या जलद प्रगतीच्या क्षमतेसाठी ओळखली जाणारी ही लीग आणखी एका रोमांचक नवीन हंगामासाठी सज्ज झाली आहे.

भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या विद्यमाने निरज बजाज आणि विटा दाणी यांनी प्रोत्साहन दिलेली फ्रँचायझी लीग 2017 मध्ये स्थापन झाल्यापासून भारतीय टेबल टेनिससाठी एक गेमचेंजर ठरली आहे. अल्टिमेट टेबल टेनिस सारख्या उपक्रमांची भरभराट होईल आणि भारताच्या टेबल टेनिस इकोसिस्टममध्ये योगदान मिळेल याची खात्री करून संपूर्ण देशभरात या खेळाला प्रगत करण्यासाठी भारतीय टेबल टेनिस फेडरेशनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

यंदाच्या लीगमध्ये प्रथमच आठ संघांचा समावेश असणार आहे, जी युवा भारतीय पॅडलर्सना जगातील अव्वल खेळाडूंसोबत त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल. स्पर्धेचा दर्जा वाढवणे आणि खेळातील उदयोन्मुख प्रतिभेच्या वाढीला चालना देणे हे, या महत्त्वपूर्ण विस्ताराचा उद्देश आहे. अतिरिक्त संघांच्या समावेशामुळे स्पर्धात्मक स्तरावर वाढ होईल. पॅरिस ऑलिम्पिकनंतर देशात निर्माण झालेले क्रीडामयी वातावरण कायम राखण्यात ही लीग महत्त्वाची भूमिका बजावेल. शिवाय, चेन्नईमध्ये लीग आयोजित करण्याचा निर्णय शहराच्या प्रतिष्ठित क्रीडा वारशाला श्रद्धांजली अर्पण करतो, ज्याने असंख्य दिग्गज पॅडलर्स घडवले आहेत. त्यांच्या गौरवशाली वारशाचा सन्मान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी दिली आहे,फफ अशा भावनाअल्टिमेट टेबल टेनिस लीगचे सह-प्रवर्तक निरज बजाज यांनी व्यक्त केल्या.

टेबल टेनिसच्या वाढत्या लोकप्रियतेने, उल्लेखनीय भारतीय कामगिरीमुळे लीगचा विस्तार नवीन प्रदेशांमध्ये झाला आहे. त्यामुळेच अहमदाबाद एसजी पायपर्स आणि जयपूर पॅट्रियट्स या दोन प्रतिष्ठित फ्रँचायझींचा समावेश करण्याची अभिमानाने घोषणा ही लीग करते. लीगच्या 2024 आवृत्तीसह सुरू होणारा हा एक आनंददायक नवीन टप्पा आहे. भारतातील टेबल टेनिसचा दर्जा वाढवणे, आमच्या खेळाडूंना जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी आणि भारतीय टेबल टेनिसला अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे यूटीटीच्या स्थापनेमागील मुख्य ध्येय होते. भारतीय खेळाडूंनी अलिकडे चीनच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मिळवलेला ऐतिहासिक विजय आणि जागतिक सांघिक क्रमवारीद्वारे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले राष्ट्रीय पुरुष आणि महिला संघ या मिशनला अधोरेखित करतात, यावर यूटीटीच्या अध्यक्षा विटा दानी यांनी जोर दिला.

Exit mobile version