पुन्हा अवकाळीचं संकट

मुंबई : एप्रिल महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एप्रिलच्या शेवटाला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकणातील तापमान पुढील दोन-तीन दिवस कोरडे राहण्याची शक्यता आहे. दमट हवा, अधिक आर्द्रता आणि तापमानामुळे कोकणात अधिक उष्ण आणि अस्वस्थ वातावरण राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version