शेतकर्‍यांचा आवाज दाबण्याचा हिंसक प्रयत्न- शरद पवार

। मुंबई । प्रतिनिधी ।
लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. आमच्या शेतकर्‍यांचा आवाज दाबण्याचा हा हिंसक प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथील घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, असे पवार यांनी म्हटलं आहे.

पटोलेंचा निशाणा
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबीयांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखालील तालिबानी राज असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Exit mobile version