राज्यातील ९२ नगरपरिषदांसाठी १८ ऑगस्टला मतदान

| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, क्लाहूपर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे.

निवडणुका जाहीर झालेल्यामध्ये अ वर्गातील 6 नगरपरिषदा- भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड, उस्मानाबाद ब वर्गातील 28 नगरपरिषदा- मनमाड, सिन्नर, येवला, दौंडाईचा- वरवाडे,शिरपूर- वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी-वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव- सुर्ज क वर्गातील नगरपरिषदा- कुरुंदवाड, मुरगुड, वडगांव, गंंगापू

Exit mobile version