| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील वेळास्ते ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या वांद्रे-वावे-वेळास्ते गावांना जोडणाऱ्या रस्त्याची पार दुरवस्था झाली असून, रस्ता दुरुस्तीची मागणी माजी सरपंच संदीप गोणबरे यांनी केली आहे. साळाव-मुरुड रस्त्यावर मजगावपासून 4 कि.मी., तर उसरोली फाट्यापासून तेवढेच अंतर असलेल्या वांद्रे-वावे-वेळास्ते जोड रस्त्याचा जवळचा मार्ग म्हणून ग्रामस्थ सातत्याने वापर करीत असतात. या रस्त्यावर असलेल्या पुलावर खड्डे पडले असून, रस्ता खचल्याने याचा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने यात तातडीने लक्ष पुरवून वांद्रे-वावे-वेळास्ते गावांना जोडणाऱ्या या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी श्री. गोणबरे यांनी केली आहे.