पळस्पे गावात सांडपाणी नदीपात्रात

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; ग्रामस्थीची तीव्र नाराजी व्यक्त

| पनवेल | प्रतिनिधी |

पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे. पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला सांडपाणी पनवेल तालुक्यातील पळस्पे गावात सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायत पळस्पेने रायगड जिल्हा अध्यक्ष शेतकरी सभेचे अनिल दंडेकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

पळस्पे हद्दीतून वाहणाऱ्या नदीपात्रात काही हॉटेल्स व निवासी संकुलांचे सांडपाणी थेट सोडले जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होऊन बंधाऱ्यांमध्ये साचत आहे. या दूषित पाण्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या बोअरवेल्सवर तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर होत असून अनेक ठिकाणी पाणी पूर्णतः खराब झाले आहे.

या सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी नदीपात्रात योग्य तांत्रिक पद्धतीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ग्रामपंचायतीने नमूद केले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीमार्फत संबंधित विभागांना याबाबत तांत्रिक अंदाजपत्रक तयार करून देण्याची प्रक्रिया सुरू असून सार्वजनिक बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच गावालगत सुरू असलेल्या अवैध बांधकामांमुळे नैसर्गिक पाण्याचे नाले बंद झाल्याने पावसाळ्यात घरांमध्ये व शाळांमध्ये पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
या सर्व बाबींची तातडीने दखल न घेतल्यास ग्रामपंचायत पळस्पे व ग्रामस्थांच्या वतीने जलसमाधी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात
आला आहे.

शोषखड्डे तयार करणे
घरातील सांडपाण्याची योग्य पद्धतीने केलेली विल्हेवाट म्हणजे शोषखड्डा होय. सांडपाणी मुद्दाम तयार केलेल्या शोषखड्डयात सोडावे, तेथून ते जमिनीत मुरते. आंघोळीच्या मोरीतील, धुण्याभांडीच्या पाण्याचीही विल्हेवाट शोषखड्ड्याद्वारे होऊ शकते. वाळु असलेल्या, मुरमाड जमिनीत ह्या पाण्याचा चांगला निचरा होतो. पण चिकणमाती असलेल्या जमिनीत मात्र याचा फारसा उपयोग होत नाही. अशावेळी चर खणून पाण्याला दूर न्यावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यास आळा बसेल व त्यापासून रोगराई टाळण्यास मदत होते. त्यामुळे शोषखड्डे तयार करणे उपयोगाचे ठरते.
Exit mobile version