नवीन वर्षात वॉटर टॅक्सी सेवा

मुंबई । वृत्तसंस्था ।
नविन वर्षात राज्यात मुंबई ते नवी मुंबई पर्यंतचा प्रवास आता 15 मिनिटांमध्ये होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2022 पासून सुरू होणार्या बहुप्रतिक्षित मुंबई वॉटर टॅक्सी सेवा फेरीमुळे बेलापूर आणि नेरूळ येथील टर्मिनल्स दरम्यान प्रवास करता येण्याची अपेक्षा आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई ते नवी मुंबई या बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन करतील. सरकारने आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ते एलिफंटा, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल (डीसीटी) ते रेवस, करंजाडे, धरमतर, डीसीटी ते बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली, खांदेरी बेटे आणि जेएनपीटी असे मार्ग विविध वाहतूक करणार्‍यांना दिले आहेत.

Exit mobile version