जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही
। चिपळूण । वार्ताहर ।
चिपळूण परिसरात 22 जुलै रोजी आलेल्या महापूरात होत्याचे नव्हते झाले. परिमिरीत हानी झाली. यावर उपया म्हणून गाळ काढण्याचे काम सुरू झाले. कितीही मोठे संकट आले तरी त्यातूनही वेगळी संधी शोधायला हवी. गाळ काढतानाच शहराशेजारी असलेल्या नदी परिसराचा विकास व्हायला हवा. त्यादृष्टीकोनातून आतापासूनच पावले टाकायला हवीत. यातून पर्यटन वाढीला नक्कीच मदत होईल, चिपळूणच्या पुरमुक्तीसाठीची कामे यापुढेही नियमीतपणे सुरू राहतील, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशाची पाहणी केली. त्यानंतर व्हॉटेल अभिरूची येथे सुरू असलेल्या कामांचा पॉवर प्रेझेंटेशन द्ववारे आढावा घेतला. जलसंपदाच्या अधिकार्यांनी गाळ काढणेकामी झालेल्या व प्रस्तावीक कामांची माहिती दिली. यानिमीत्ताने गाळ गाढण्यासाठी परिश्रम घेणार्या अधिकार्यांना जलसंपदा मंत्र्याच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, महापूराने चिपळूणासीयांचे मोठे नुकसान झाले आहे. आपत्ती कधी आणि कशी येईल हे सांगता येत नाही. निसर्गाचे मोजमापही हातात राहीलेले नाही. 22 जुलैच्या रात्री एकाच दिवसात होत्यांचे नव्हते झाले. आपत्तीला सरकार किती तोंड देणार, यालाही मर्यादा येत आहेत. गेल्या काही वर्षात कोकणात जास्त आपत्ती कोसळली आहे. या आपत्ती मधून नागरिकांनी सावरण्यासाठी महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात मदत केली. महापूरानंतर चिपळूणकरांनी आवाज उठवला.
राज्यपातळीवर त्याची दखल घेण्यात आली. चिपळूणकरांच्या मागणीचा परिपाक म्हणून गाळ काढण्याची विशेष मोहिम सुरू झाली. 7.84 लाख घटमिटर गाळ काढावयाचा असून आतापर्यंत 4 लाख घन मिटर गाळ काढला आहे. गाळ काढण्यासाठी शासनाने 17 कोटी 56 लाख रूपये खर्चुन 14 पोकनेल व 30 डंपर घेतले आहे. यातील 7 पोकलेन व 15 डंपर चिपळूणच्या कामासाठी वापरले जात आहेत. दरम्यान गाळ काढण्यासाठी सार्वजनिक जागा संपुष्टात येत आहेत. खासगी मालकांना गाळ हवा असला तरी याबाबतचा निर्णय लवकरच शासनस्तरावरून होईल. नद्यातील गाळ, अडथळा ठरणारी बेटे काढल्याने पुराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. मात्र संकट काळातही आपण विकासाची संधी शोधायला हवी. नदीकिनारी सरंक्षक भिंती, बगीचा करतानाच पर्यटनात्मक नदीचा उपयोग करून घ्यावा. त्यासाठीची कामे हळूहळू का होईना आतापासूनच सुरू करावीत. अशा सुचनाही मंत्री पाटील यांनी केल्या. यावेळी आ. शेखर निकम, माजी आ. रमेश कदम, कोकण विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, यांच्यासह जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी, नाम फाऊंडेशन, चिपळूण बचाव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.