वाहतूक कोंडी कधी सुटणार?

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड-नादगांव ग्रामपंचायत हद्दीतील सुरेल पेठ येथील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने सामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. मुरुड-नांदगाव मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. त्यात अरुंद रस्ते व रस्त्यावर बिंधास्तपणे मोटारसायकल लावल्याने याठिकाणी जास्त वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन पुढे येऊन ही वाहतूक कोंडी सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Exit mobile version