नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन
| पाताळगंगा | वार्ताहर |
वयाळ गावानजीक पाताळगंगा नदी वाहत असताना जल जीवन मिशन अंतर्गत राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील सुरेश पाटील यांच्या पुढाकाराने नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी विहिरीच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक गावात विहीरी आहेत काहीचे पाणी दुषित झाले आहे तर काही कोरड्या पडल्या आहेत. साधारण मात्र मार्च महिन्यात विहीर तळ गाठत असतात. यामुळे महिला वर्गांस पाणीच्या टंचाईला सामोरे जावे लागत असते. मात्र नदिच्या ठिकाणी विहीर खोदल्यास सातत्याने पाणी राहणार असून शिवाय महिला वर्गांची पाण्यासाठी सुरु असलेली वणवण थांबणार आहे. या सर्व बाबीचा आभ्यास करून जल जिवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी या जागेचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील, टेंभरी सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच दर्शना फाटे, ग्रामसेवक गोकुळदास राठोड, उद्योजक विनोद भोईर, ग्रा.पं.सदस्य निखिल पाटील, रोशन गायकवाड, निलेश ठोंबरे, अपर्णा पवार, सपना ठोंबरे, ग्रामस्थ व युवक मंडळ उपस्थित होते.