वाढत्या कोरोनाने शाळेची घंटा वाजणार का?

टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्णय – शिक्षणमंत्री
| मुंबई | प्रतिनिधी |
शैक्षणिक सत्र सुरु व्हायला अवघा आठ,दहा दिवस उरले असतानाच राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.त्यामुळे यावर्षीही शाळेची घंटा वेळेत वाजणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टास्क फोर्सशी चर्चा करुन नवीन नियमावली जाहीर केली जाईल,असे जाहीर केले आहे.

देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांपार्यंत अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. पुणे, मुंबई, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्येही पुन्हा करोनाचा प्रसार होत आहे. असे असताना राज्यात पुन्हा एखदा नव्या शैक्षणिक वर्षांतर्गंत येत्या 15 जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. याच पाश्‍वर्र्भूमीवर राज्यात शाळा पुन्हा बंद होणार की शाळा सुरुच राहणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा बंद करणे चुकीचे असल्याचे गायकवाड म्हणाल्या आहेत
सध्या करोना वाढत आहे त्यामुळे आम्हाला निश्‍चितच काही निर्णय घ्यावे लागतील. सध्या शाळा सुरु करणे गरजेचं आहे. या महिन्याच्या 15 तारखेला शाळा सुरु होतील. मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता शाळा सुरु ठेवणे अवश्यक आहे. शाळा, शिक्षक, वही असं वातावरण असणं आवश्यक आहे. मागील दोन वर्षांमध्ये दुसरीची मुलं शाळेतच आलेली नाहीत. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करु, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

शाळा सुरु करण्यापूर्वी टास्क फोर्सशी आम्ही चर्चा करू आणि नंतरच एसओपी जाहीर करु. सध्या सर्व मुलांची करोना चचणी करण्याची गरज नाही. सध्या राज्य आणि केंद्र सरकारचे करोना प्रतिबंधक नियम वेगळे आहेत. त्यामुळे टास्क फोर्सशी चर्चा करुनच एसओपी जारी केली जाईल.

वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री
Exit mobile version