लॉकडाऊनमध्ये दाखल सर्व गुन्हे मागे घेणार

। मुंबई । वृत्तसंस्था ।
लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी तसेच नागरिकांवर नियमांचं उल्लंघन केल्याने कलम १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. मंत्रिमंडळाकडून या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

बैलगाडा शर्यतींचे गुन्हेही मागे घेणार?
“राजकीय किंवा बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे असतील तर ते मागे घेण्यासंबंधी निर्णय झाला आहे. प्रक्रियेप्रमाणे सर्व जिल्हा प्रमुखांकडून शासनाकडे निर्णय येईल त्यानंतर सरकार निर्णय घेईल आणि नंतर कोर्टात जाऊन गुन्हे मागे घेतले जातील,” असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

“कोव्हीड काळात ज्या नागरिक किंवा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार आहोत. मंत्रिमंडळात हा विषय मांडला जाईल”.

दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
Exit mobile version