राज्यात पावसाचा यलो अलर्ट

। मुंबई । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गणेश चतुर्थीनंतर पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. आता गणेश विसर्जनाच्या काळातही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्याासह कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार वार्‍यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यभरात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चार-पाच दिवस राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Exit mobile version