। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यभरात मान्सून सक्रिय झाल्याचं दिसत आहे. मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, पावसाने हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवसत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यात मुख्यत्वे कोकणाचा समावेश आहे.
मुंबई, ठाण्याला यलो तर रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट
पुढील 3 ते 4 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबईत उद्या संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार आहे. परिणामी उद्यापासून मुंबई, ठाण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता उद्यापासून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणात चांगल्या पावसाची शक्यता आहे.