रेल्वे पुलावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रेल्वे पुलावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे.

रत्नागिरी शहरामधील मुरुगवाडा येथे राहणारा सुरेंद्र राजेंद्र किर (38) याला दारुचे व्यसन होते. आत्महत्या करण्याच्या हेतूने हा गुरुवारी (दि. 15) दुपारच्या सुमारास रत्नागिरीतील कुवारबाव येथील डी मार्टच्याजवळ असणाऱ्या रेल्वे पुलावर आला. तिथून त्याने आत्महत्या करणार असल्याचे बहिणीला फोनवरून सांगितले आणि त्याने पुलावरून जाणाऱ्या रेल्वे गाडीवर उडी घेत आत्महत्या केली. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version