सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (16 मे) महत्वाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला जिथे पाऊस नसेल तिथे निवडणूका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पावसाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे.
ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात निवडणुकांबाबत सुनावणी सुरु आहे. राज्यातील 14 महापालिकांच्या प्रभाग रचना अंतिम करण्याची सध्या लगबग सुरु आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेने नुकतीच अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुका जाहीर कराव्यात असेही कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सुचवले आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला हरकत नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे.
