I मुंबई I प्रतिनिधी I
राज्यातील कोरोना संसर्ग ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यानुसार निर्बंध विविध टप्प्यांमध्ये शिथिल केले जात आहेत. तर, जनजीवन सुरळीत करण्यासाठीदेखील विविध सेवा हळूहळू पूर्ववत केल्या जात आहेत. याचाच एक भाग असलेला राज्याची परिवहन सेवादेखील आता सुरळीत होत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी वगळता एसटीची राज्यातील सेवा सर्वसामान्यांसाठी बंदच होती. मात्र, आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने एसटी पुनश्च एकदा हरी ओम करत आहे. सोमवारपासून सामान्यांसाठीही एसटीची सेवा पूर्ववत होत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून एक ट्विटदेखील करण्यात आलं आहे.
एसटीचा पुनश्च हरी ओम.. प्रवाशांच्या सेवेसाठी चला करू प्रवास आपल्या लाडक्या एसटी संग. सुरक्षित आणि किफायतशीर! (स्थानिक जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार) असं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मास्क व निर्जंतुकीकरण याचे लोगेदेखील दर्शवले आहेत.काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल होत असल्याने एसटीने एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यातही जाता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी करतानाच कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. यात पहिल्या चारही स्तरांत मोडणार्या जिल्ह्यात प्रवास ई-पासशिवाय करता येणार आहे.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.