। महाड । जुनेद तांबोळी ।
महाड शहरात पावसाने धुमाकूळ घातला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरात जवळपास साडेतीन फूटांपर्यंत पाणी शिरले आहे. अशातच अनेक जण गच्चीचा आधार घेत जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत असतानाचा रोहिदास नगरमध्ये गच्चीवरुन पडून 50 वर्षीय संजय नारखेडे यांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर न पडू नये, तसेच सुरक्षितस्थळी राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.