केरळमध्ये मुसळधार पावसात 10 जण बेपत्ता

। तिरुवंतपूरम । वृत्तसंस्था ।
केरळच्या दक्षिण आणि मध्य भागात शनिवारी मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आणि अनेक नद्यांना पूर आला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यांसाठी ङ्गरेड अलर्टफ जारी करण्यात आला आहे.आतापर्यंत या पावसात 10 जण बेपत्ता झालेले आहेत. दक्षिण -पूर्व अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे, 18 ऑक्टोबर रोजी विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि 19 ऑक्टोबरच्या सकाळी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version