अपघातात 14 वर्‍हाड्यांचा मृत्यू

| उत्तराखंड | वृत्तसंस्था |
लग्नसोहळा आटपून घरी परतणार्‍या वर्‍हाड्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. गाडी दरीत कोसळल्याने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील टनकपूर-चम्पावत महामार्गावरील सुखीढांग-डांडामीनार मार्गावर ही दुर्घटना घडली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version