| मुंबई | प्रतिनिधी |
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून जावं लागेल, असा नरेंद्र मोदी अमित शाहांकडूनच थेट संदेश देण्यात आला असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आहेत. त्यांनी भाजपच्या ट्विटवरही भाष्य केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यापुढे संजय राऊत यांनी सांगितलं की, अजित पवार यांचे मुख्यमंत्रिपदाचे दरवाजे बंद झाले आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं स्थान हे धुळीस मिळालं आहे. याची सर्व माहिती केंद्राला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल राजीनामा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने त्या पद्धतीने निर्णय दिला आहे तो मान्य करावा लागेल. अशा प्रकारचा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे.
भाजपकडून करण्यात आलेल्या ट्विटवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या ट्विट करण्या मागचा भाजपचा हेतू सांगितला आहे. देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार नाही. सर्वोच्च न्यायालयाने तुमच्यावर ताशेरे उडवलेले नाहीत. जर महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे आणि ते देवेंद्र फडणवीस असतील तर आम्ही त्याचे स्वागत करू, असंही राऊत म्हणालेत.