• Login
Friday, June 27, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

मुंबईला तिसरा डबा  

Varsha Mehata by Varsha Mehata
January 10, 2024
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुंबईत पूर्वी लोकल गाड्यांना नऊ डबे असत. मग बारा डब्यांच्या गाड्या सुरू झाल्या. डब्यांची संख्या वाढली तरी बहुतेक रेल्वे स्टेशनचे फलाट जुनेच म्हणजे कमी लांबीचे होते. मग काही दिवस गाड्या दोनदा थांबवाव्या लागत. आधी पुढचे डबे फलाटाला लागत. नंतर गाडी पुढे घेऊन उरलेल्या डब्यातली माणसे फलाटावर उतरू शकत. आता पंधरा डब्यांच्या गाड्यांची मागणी होते आहे. भविष्यात ती 21 डब्यांचीही होईल. मुंबईतल्या रेल्वेलाच नव्हे तर या शहरालाही सतत असे नवनवे डबे जोडणे चालू असते. 1970 च्या दशकात नवी मुंबईचा दुसरा डबा तिला जोडला गेला. त्यामुळे मुख्य शहरातली गर्दी कमी होईल असे सर्वांना वाटले. प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. आज पालघरपासून खोपोलीपर्यंत आणि कसाऱ्यापासून पेणपर्यंत मुंबई पसरतच चालली आहे. आता तिला तिसऱ्या मुंबईचा आणखी एक डबा जोडण्याचे चालू आहे. शिवडी-न्हावा सागरी पूल लवकरच खुला होईल. त्याच्या आजूबाजूला तिसरी मुंबई वसवण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिल्याच्या बातम्या आहेत. उलवे, उरण, पेण, पनवेल, कर्जत या भागातील 323 चौरस किलोमीटर पट्टयात हे नवे शहर वसवले जाईल. यासाठी 124 गावांमधील जमीन मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत संपादित केली जाईल असे या बातम्यांमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे यासाठी नैना प्रकल्पातील 77 गावे तेथून वगळून तिसऱ्या मुंबईत समाविष्ट केली जातील. शिवाय खोपटा नवे शहरमधील 33 गावेही त्यात असतील. नवी मुंबईच्या विकासाची जबाबदारी ज्याप्रमाणे सिडकोवर देण्यात आली होती त्याप्रमाणे मुंबईला नवा डबा जोडण्याचे काम न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथॅरिटी किंवा नवनगर विकास प्राधिकरण नावाच्या संस्थेकडे सोपवले जाईल. गावांची संख्या भविष्यात दोनशेपर्यंत जाईल असाही एक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

रायगडवर परिणाम

गेल्या काही वर्षात मुंबईचा विकास व विस्तार यांचा सर्वाधिक परिणाम रायगड जिल्ह्यावर झाला आहे. मुंबईच्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात सुमारे सत्तर वर्षांपूर्वी हीच स्थिती ठाणे जिल्हयाची झाली. त्यावेळी डोंबिवली, कल्याण ते कसारा आणि इकडे बोरीवली ते पालघर (तेव्हा तो स्वतंत्र जिल्हा नव्हता) हा पट्टा मुंबईत ओढला गेला. नवी मुंबई वसवली जाण्याच्या काळात मुंबईच्या विकासाने रायगड जिल्ह्यात हातपाय पसरले. पनवेल हे मुंबईचे उपनगर बनले. तिकडे कर्जत व खोपोलीपर्यंत लोकल जाऊ लागल्याने तीदेखील मुंबईशी अधिक जोडली गेली. आता तिसरा डबा किंवा तिसरी मुंबई वसवताना उत्तर रायगडचा बराचसा भाग मुंबईत विलीन होणार आहे. उरणपर्यंत रेल्वे पोचल्यानंतर आणि शिवडीला रस्तेमार्गाने जोडले गेल्याने हे होणारच होते. पण आता तिसऱ्या मुंबईच्या रुपाने हा विकास अधिक नियोजनपूर्वक होणार आहे. याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम आहेत. विकासाच्या पहिल्या टप्प्यात रेल्वेने गावे जोडत गेली तसतशी तेथील वस्ती वाढत गेली. मात्र त्यावर सरकारचे कोणतेच नियंत्रण नव्हते. तेव्हाच्या सरकारने तशी दृष्टीही ठेवली नव्हती. ठाण्याच्या पुढची कळवा, दिवा, डोंबिवली, कल्याण इत्यादी अनेक रेल्वे स्टेशन्स व तेथे झालेला विकास हा या नियोजनशून्यतेची साक्ष देतो. या सर्व इलाख्यांमध्ये वाटेल तशी बांधकामे झाली आहेत. रस्त्यांची नीट सोय नाही. त्यामुळे बहुतांश भाग कमालीच्या गर्दीचे, घाणीने भरलेले व सदैव वाहतूक कोंडीत अडकलेले असे दिसतात. नवी मुंबई वसवताना हे सर्व टाळण्याचा प्रयत्न केला गेला. तेथील रस्ते, घरबांधणी ही अधिक सुनियोजित होती. पाण्याची सोयही बरी होती. याच धर्तीवर आता तिसऱ्या मुंबईतील प्रस्तावित प्रदेशाचा विकास होणार असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. एवीतेवी या भागांचे नागरीकरण होणे हे टळणारे नाहीच. तर मग ते अधिक शिस्तबद्ध रीतीने झाले तर सर्वांच्याच फायद्याचे ठरू शकते.

रक्त सांडायला लावू नका

मात्र याला दुसरीही बाजू आहे. या विकासातून स्थानिक जनतेला नक्की काय व किती लाभ होणार हा यातला कळीचा मुद्दा आहे. आज या भागात राहणाऱ्यांकडे जमिनी हे त्यांचे एकमेव भांडवल आहे. अनेकांकडे तर तेही नाही. नव्या रचनेत त्या सर्वांना कसे सामावले जाणार याची स्पष्ट घोषणा सरकारने सुरुवातीलाच करायला हवी. रायगड जिल्ह्यातील जनतेला आजवर फार कटू अनुभव आले आहेत. सेझ, महासेझ, रेल्वे, रिलायन्स, गेल, जेएसडब्ल्यू, अलिबाग-विरार मार्ग अशा विविध नावाखाली या भागातील शेकडो एकर जमिनी संपादित केली गेली आहे वा तशी टांगती तलवार येथील जनतेच्या डोक्यावर आहे. अनेकदा नागरिकांचा प्रकल्पांनाही विरोध नसतो. मात्र त्यांच्या जमिनींचा मोबदला त्यांना किती दिला जाणार हे कधीही स्पष्टपणे सांगितले जात नाही. काही प्रकल्पांमध्ये मोबदल्याची रक्कम जाहीरही होते. पण ती हमखासपणे इतकी तुटपुंजी असते की, नागरिकांना प्रत्येक पावलाला संघर्ष करावा लागतो. वास्तविक नवीन जमीन अधिग्रहण कायद्यानुसार रस्ते इत्यादी लोककल्याणाच्या प्रकल्पांसाठी जमिनी संपादन केल्या तरीही घसघशीत मोबदला द्यावा लागतो. तिसरी मुंबईसारखे प्रकल्प तर सरळसरळ व्यापारी स्वरुपाचे असतात. त्यातून सरकार, खासगी कंपन्या, बिल्डर इत्यादींना प्रचंड फायदा होणार असतो. उदाहरणार्थ तिसऱ्या मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर एक व्यापारी केंद्र वसवले जाणार आहे. तेथील इमारतीच्या किमतींची केवळ कल्पना करता येण्यासारखी आहे. अशा स्थितीत या विकासाचा व पैशांच्या उलाढालीचा स्थानिक नागरिकांना पुरेपूर लाभ व्हायला हवा. शिवाय, त्यांना एकदाच मोठी रक्कम नव्हे तर दीर्घ काळासाठी उत्पन्न मिळत राहील अशी तरतूद त्यातून केली जायला हवी. दुर्दैवाने, अशा प्रकल्पांचे विकासक खासगी असो की सरकारी ते स्थानिकांना पिळून कसे घेता येईल व कमीत कमी रकमेत जमिनी कशा लाटता येतील हेच पाहतात. मग आंदोलने सुरू होतात व स्थानिकांना न्यायासाठी घाम आणि रक्त सांडावे लागते. मुंबईला नवा डबा जोडताना तरी हे टळावे.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

नार्वेकरांचा महानिकाल! लोकशाहीची हत्‍या

Next Post

वि.स. खांडेकर लेखक आणि व्यक्ती

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
sliderhome

भारताचे मिशन ‘मेडल्स’

July 22, 2024
Next Post
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण

वि.स. खांडेकर लेखक आणि व्यक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+29°
+27°
Alibag
Thursday, 26
Friday
+28° +27°
Saturday
+29° +27°
Sunday
+28° +26°
Monday
+28° +27°
Tuesday
+28° +27°
Wednesday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.