विजय साजरा केल्यामुळे 7 जणांवर कारवाई
। मुंबई । वृत्तसंस्था ।
नुकतच टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारतावर विजय मिळवल्यामुळे भारतातील काही लोकांनी हा विजय साजरा केल्याचं समोर आल होत. त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा क्रिकेटचा सामना नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव केल्यामुळे या चर्चेला वेगळं वळण मिळालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांनी पाकिस्तानचा विजय साजरा केल्यामुळे त्यावरून वातावरण चांगलंच पेटलं असून आता त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
पाकिस्तानचा विजय साजरा करणार्या एकूण 7 जणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधल्या एकूण 5 जिल्ह्यांमधून या 7 जणांना अटक करण्यात आली आहे.