नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात उपाशीपोटी कोणीही मरणार नाही,याची दक्षता केंद्राने घ्यावी, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. यासाठी केंद्राला सामुहिक भोजन धोरण निश्चित करण्यासाठी शेवटची संधी देत असल्याचेही सुचित केलेले आहे.
या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सरन्यायाधीश एन.व्ही.रमण,ए.एस.बोपन्ना, हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे यांच्या पुढे सुनावणी झाली. यावेळी रमण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.तसेच याबाबत केंद्रीय ग्राहक,अन्न पुरवठा मंत्रालयातर्फे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राबाबतही नाराजी व्यक्त केली.सामुहिक भोजन धोरण ठरविण्याबाबत सर्व राज्यांना यापूर्वीच निर्देश देण्यात आल्याचे या प्रतिज्ञापत्रातून नमूद करण्यात आलेले आहे.