• Login
Tuesday, December 30, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकाप आ. जयंत पाटील यांनी अतिवृष्टीमुळे रस्ते-पुलांच्या नुकसानाबाबत धरले धारेवर

Varsha Mehata by Varsha Mehata
December 22, 2021
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
बोडणी येथील जेट्टीच्या कामाबद्दल आ. जयंत पाटील आक्रमक…व्हिडीओ बघून ग्रामस्थांनी मानले आभार
0
SHARES
66
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या लहान मोठ्या पुलासह साकव, मोर्‍या तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानीबाबतचा प्रश्‍न उपस्थित करुन तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीचे प्राप्त प्रस्तावांना निकड, निधी निकषांच्या अधीन राहून मंजूरी प्रदान करण्याचे नियोजन असून रस्त्यांची कामे तात्पुरती दुरुस्ती करुन रस्ते वाहतूकीस तात्पुरत्या स्वरुपात पूर्ववत करण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली.
आ. जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नानुसार राज्यात बहुतांश भागात माहे जुलै, 2021 व माहे सप्टेंबर, 2021 मध्ये वा त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यासह इतर जिल्हयातील लहान मोठ्या पुलासह साकव, मोर्‍या तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, हे खरे आहे काय, असल्यास, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पुल नादुरुस्त झाले आहेत तसेच रस्त्यावरची माती वाहून गेल्यामुळे रस्ते खचले असून काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, हे ही खरे आहे काय, असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, चौकशीनुसार पडलेल्या व नादुरूस्त झालेल्या पुलांच्या व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणती कार्यवाही केल्याबाबतची माहिती मागितली.
यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उत्तर देताना रायगड जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे पुलांचे व रस्त्यांचे नुकसान झाल्यावे मान्य केले. रायगड जिल्ह्यामध्ये माहे जुलै, 2021 ते सप्टेंबर, 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून लहान मोठ्या पूलासह साकव, मोन्या तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीचे प्राप्त प्रस्तावांना निकड, निधी निकषांच्या अधीन राहून मंजूरी प्रदान करण्याचे नियोजन आहे. रस्त्यांची कामे तात्पुरती दुरुस्ती करुन रस्ते वाहतूकीस तात्पुरत्या स्वरुपात पूर्ववत करण्यात आले असल्याचे सांगितले.

राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी
आ.जयंत पाटील यांचा तारांकित प्रश्‍न

आ. जयंत पाटील यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित करीत राज्यातील किती पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले व करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार किती पुल हे धोकादायक स्थितीत असल्याचा सवाल केला. त्यावर एकूण 678 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले व सदर स्ट्रक्चरल ऑडिटच्या प्राप्त अहवालानुसार राज्यात 08 पुल जड वाहतुकीस धोकादायक असल्याने निदर्शनास आले आहे. तथापि, सद्य:स्थितीत दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने सदर पुलांवरून अवजड वाहतूक धोकादायक असल्याचे पुलांच्या दोन्ही बाजूस सावधानीचा इशारा ( cautionary sign ) दर्शविणारे फलक लावण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सभागृहाला दिली.
आ. जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नानुसार महाड तालुक्यातील (जि. रायगड) सावित्री नदीवरील पुल कोसळून घडलेल्या घटनेमुळे शासनाने राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे संबंधित विभागास निर्देश दिले होते का याची विचारणा केली.
तसेच राज्यातील किती पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले व करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार किती पुल हे धोकादायक स्थितीत आहेत. राज्याच्या दळणवळणाच्या क्षेत्रात नद्या आणि ओढ्यांवरील पुलांच्या कोसळण्याच्या दुर्घटना लक्षात घेऊन केंद्रीय महालेखापालांनी पुलांचे सर्वेक्षण केले आहे. सदर केलेल्या सर्वेक्षणात सन 2016 मध्ये राज्यात असणार्‍या पुलांच्या संख्येतील दुरुस्तीसाठी प्रतीक्षेत असणारे 2 हजार 635 पुलापैकी केवळ 363 पुलांची डागडुजी करण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले. राज्यातील सुमारे 2 हजार 272 पुलांच्या दुरुस्त्या प्रलंबित असून या पुलांव्यतिरिक्त 300 हून अधिक पुलांची मुदत संपली आहे तर 250 हुन अधिक पुलांवरून वाहतूक करणे धोकादायक ठरत असल्याचा उल्लेखही आ. जयंत पाटील यांनी केला. त्याचप्रमाणे राज्यातील धोकादायक स्थितीत असलेल्या पुलांच्या दुरुस्तीबाबत शासनाकडून कोणती उपाययोजना वा कार्यवाही करण्यात आली वा येत आहे. तसेच शासनाने पुलांवरील प्रवास सुरक्षित होईल व दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने कोणती उपाययोजना केली वा करण्यात आली आहे,
या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी महाड सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घ टनेच्या अनुषंगाने दिनांक 19 ऑगस्ट, 2021 च्या शासन परिपत्रकाद्वारे सा.बां. विभागाच्या अखत्यारीतील पुलांचे नियतकालिक परिरक्षण करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक निर्गमित करण्यात आल्या आहेत. राज्यात एकूण 678 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले व सदर स्ट्रक्चरल ऑडिटच्या प्राप्त अहवालानुसार राज्यात 08 पुल जड वाहतुकीस धोकादायक असल्याने निदर्शनास आले आहे. तथापि, सद्य:स्थितीत दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने सदर पुलांवरून अवजड वाहतूक धोकादायक असल्याचे पुलांच्या दोन्ही बाजूस सावधानीचा इशारा (cautionary sign) दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत. महालेखाकार यांचेकडून सन 2018-1 मध्ये पुलांचे निष्पादन लेखापरीक्षा करण्यात आले आहे. सदर लेखापरीक्षा अहवाल सन 2020 मध्ये प्राप्त झाला आहे. महालेखाकार यांचेकडून सन 2018-19 मध्ये पुलांचे निष्पादन लेखापरीक्षा अहवालात नमूद केलेली पुल दुरुस्ती संदर्भातील स्थिती ही सन 2016 मधील असून सद्य:स्थितीत आवश्यकतेनुसार पुलांची दुरुस्ती करण्यात आलेली असून सद्य:स्थितीत पुल वाहतुकीकरीता सुस्थितीत ठेवण्यात आलेले असल्याचे स्पष्ट केले.

Related

Tags: bhai jayant patilmaharashtramumbaipwpskp
Previous Post

पाच वर्षापासुन बेपत्ता असलेल्या मुलाची आई-वडिलांशी झाली गाठभेट

Next Post

शरीरसौष्ठव महाराष्ट्र राज्य निवड चाचण्यांचे चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चारशे उमेदवारी अर्ज दाखल
पनवेल

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चारशे उमेदवारी अर्ज दाखल

December 30, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

तिकीट नाकारल्याने भाजपा माजी नगरसेवकांची बंडखोरी

December 30, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

खांदेरी दुर्गावर विजय दिनाचे आयोजन

December 30, 2025
महादेव वाघमारे यांचा अर्ज दाखल
पनवेल

महादेव वाघमारे यांचा अर्ज दाखल

December 30, 2025
टॅक्सी, ऑटो रिक्षाचे भाडेदर जाहीर
sliderhome

टॅक्सी, ऑटो रिक्षाचे भाडेदर जाहीर

December 30, 2025
प्रतीक जाधवची अवकाशाला गवसणी
sliderhome

प्रतीक जाधवची अवकाशाला गवसणी

December 30, 2025
Next Post
शरीरसौष्ठव महाराष्ट्र राज्य निवड चाचण्यांचे चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

शरीरसौष्ठव महाराष्ट्र राज्य निवड चाचण्यांचे चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?