तालुका कृषी अधिकारी रवींद्र पवार यांचे आवाहन
। माणगाव । प्रतिनिधी ।
चालू खरीप हंगाम यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव मार्फत बीज प्रक्रिया मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. धान उत्पादन वाढिमध्ये बीज प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून जमिनीतून व बियाणे द्वारे पसरणारे रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी बीज प्रक्रिया कमी खर्चात अत्यंत प्रभावी साधन आहे. या दृष्टीने खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर बिजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी करण्याचे दृष्टीने मोहीम स्वरूपात माहे मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यामध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती माणगाव तालुका कृषी अधिकारी रवींद्र डी.पवार यांनी देत खरीपमध्ये बीजप्रक्रिया करूनच धान्याची पेरणी करा असे आवाहन त्यांनी केले आहे.
माणगाव तालुक्यांमध्ये बीज प्रक्रिया मोहीम लोकसहभागातून विनाअनुदान तत्त्वावर राबविण्यात येत असून बियाणे बदल कमी असलेला भात पिकामध्ये शेतकर्यांकडील स्वतःचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त आहे, अशा बियाण्यावर जमिनीतून व बियाणे द्वारे होणार्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो त्यामुळे शेतकर्यांच्या पीक संरक्षणावरील खर्चामुळे पिकाचे उत्पादन खर्चात वाढ होते व पर्यायाने उत्पादन घटते, त्याकरिता बीज प्रक्रिया मोहिमेअंतर्गत अशा शेतकर्यांना स्वतःकडील मागील वर्षीचे घरगुती वापरात येणार्या बियाण्यास बीजप्रक्रिया करण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
तरी बीज प्रक्रिया मोहीम व खरीप हंगामाच्या आवश्यक माहितीसाठी तालुक्यातील शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचे समवेत संपर्क करावे असे आवाहन कृषि विभाग माणगाव यांच्यामार्फत करण्यात येत आहे.