। मुंबई । प्रतिनिधी ।
बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आम्ही सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी असून आज संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. राष्ट्रीय विषयावर काही भाष्य करणार नाही असंही अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल असं अजित पवार म्हणाले. विधीमंडळाबाबत काही निर्णय असतील तर ते अध्यक्ष घेतील असं ते म्हणाले. अजित पवार म्हणाले की, एनडीएचे सरकार सत्तेत असताना 25 पक्ष सोबत होते, त्यानंत यूपीएचे सरकारही अनेक पक्षांनी मिळून बनले होते. अजित पवार महाराष्ट्राच्या संदर्भात काही असेल तर ते बोलतो, बाकीचा राष्ट्रीय विषय असेल तर ते पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल बोलतील असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.