। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्ग 66 वरील पुई ग्रामपंचायत हद्दीतील महीसदरा नदीपात्रावरील पुल वाहातुकीसाठी धोकादायक ठरत आहे. महिसदरा नदीचा बांधण्यात आलेल्या पुलला 50 वर्षांहुन अधिक काळ लोटला असुन तो जीर्ण अवस्थेत आहे. या वर्षी हा जीर्ण झालेला पुल नवीन करण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न फसला असून या पुलावर एवढा मोठा खड्डा पडला आहे, कि दुचाकीस्वार पूर्णपणे खड्ड्यात जात आहे. या खड्ड्यात काल एक दुचाकीस्वार खड्ड्यात पडला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंदापूर येथील सभेत सांगितले होते कि, एका वर्षभरात मुंबई-गोवा महामार्गचे काम पुर्ण होईल. चार महिने होऊन गेले तरी या रस्त्याचे कोणतेही काम सुरु झाले नाही. नदीवरील जीर्ण झालेल्या पुलाच्या बाजूला लॉकडाऊनमध्ये नवीन पुलाचे काम सुरु केले होते. ते तसेच अर्धवट स्थितीत ठेऊन जुन्या पुलाची डागडुगी करण्याचा प्रयत्न केला गेला यांनी शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया जाऊन पुलाची परिस्थिती जैसे थे अशीच राहिली. अशा दुर्लक्षमुळे सावित्री नदी पुलासारख्या दुर्घटना घडण्याची शक्या आहे, असे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.
महिसदरा जुन्या पुलाला डागडुगी न करता बाजूला अर्धवट असणारा नवीन पुल बांधण्यात यावा याविषयी पत्रकार यांनी अनेक वेळा बातमी दिली. परंतु त्याची दख्खल घेतली नाही. लोकांच्या जिवाशी खेळ मांडला असून या परिस्थितीची जाणीव करुन घेण्यासाठी लोकप्रतिनिधीनी हवाई मार्गाने न जाता एसटीने प्रवास
-असिफ सय्यद, पुई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच