| चिरनेर । वार्ताहर ।
मुंबईतील वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत दिनांक 6 ते 12 डिसेंबर या कालावधीत रोज 11 ते 7 या वेळेत कलाविष्कार पाहायला मिळणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे येथील नामवंत अशा 15 चित्रकारानी एकत्रितपणे सादर केलेल्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकृतीचा अनोखा कलाविष्कार कलार्पण कला प्रदर्शनाचे आयोजन चित्रकार जितेंद्र गायकवाड यांनी केले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार (दि. 6) उद्योगपती विलास गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जितेंद्र गायकवाड, पुरेंद्र देवगिरीकर, शोभा भावसार, नितेश जाधव, पार्थ पाटील,अजिंक्य भगत, अनिकेत खाडे,अनिल चौधरी, सुनील देशमुख, अजय मोकल, स्वराज वांद्रे, प्रतीक भोसले, ओंकार पिलोळकर, मुक्ता कुलकर्णी, विठ्ठल पाटील या 15 चित्रकारांचा समावेश असून, त्यांनी सादर केलेला हा सौंदर्यपूर्ण बोलका व कलात्मक नमुन्याचा अविष्कार सर्वांना आवडेल असाच आहे. यात प्रामुख्याने जलरंग, तैलरंग वापरून साकारलेल्या वास्तववादी व अमूर्त शैलीतील विविध चित्रकृतीचा अनोखा कलाविष्कार रसिकांना पाहिला मिळणार आहे.