| अलिबाग । वार्ताहर ।
नवी मुंबई आगरी साहित्य विकास मंडळातर्फे घेण्यात येणारे 19 वे आगरी साहित्य संमेलन रविवार (दि.25) कोपर-खैरणे येथे होणार आहे, असे संस्थेचे संस्थापक सरचिटणीस मोहन भोईर यांनी सांगितले. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन जी.पी.पारसिक बँकेचे अध्यक्ष नारायण गावंड यांचे हस्ते होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मधू मंगेश कर्णिक, अॅड.पी.सी.पाटील, दमयंती भोईर, पुंडलिक म्हात्रे, आ.गणेश नाईक, माजी खा. जगन्नाथ पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, रामदास फुटाणे, आ. मंदाताई म्हात्रे, आ. राजू पाटील, प्रा.अरुण म्हात्रे, जयेंद्र खुणे, रवी पाटील, दशरथ भगत, अॅड.प्रसाद पाटील, रणजित पाटील, नमिता कीर, दत्तात्रेय सैतवडेकर, विलास गुर्जर इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या साहित्यिक सोहळ्यासाठी साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक म्हात्रे, सचिव मोहन भोईर, कार्याध्यक्ष चंद्रकांत मढवी, अॅड.मनोज म्हात्रे, नमाजी प्राचार्य श्रीकांत पाटील यांनी केले आहे.