| श्रीवर्धन | वार्ताहर |
कांदिवली (मुंबई) येथील बालमंदिर समाजकल्याण केंद्र येथे नुकताच महाराष्ट्र कलावंत न्याय्य हक्क समिती यांच्या वतीने काव्य संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमात श्रीवर्धन येथील कवयित्री अनिता कांबळे यांना बोरीवलीचे खा. गोपाल शेट्टी यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन राज्यस्तरीय साहित्य क्रांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी गझलकार विजय जोशी, रज्जाक शेख,कवी आनंद अहिरे, अभिनेत्री रुपाली पवार, गायिका छाया साखरे, प्रा. आशा ब्राह्मणे, सोमनाथ गायकवाड, सोहम पब्लिकेशनचे प्रकाशक व साहित्य सेवा दैनिकाचे कवी नितीन गायके आदी मान्यवर उपस्थित होते. अनिता कांबळे यांच्या आजवर अनेक कविता पुस्तक रुपाने प्रकाशित झाल्या असून त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.