| माणगाव | प्रतिनिधी |
शैक्षणिक क्षेत्रात विविधांगी उपक्रम राबवून ज्ञानवृद्धीसाठी सतत प्रयत्नशील असणार्या ‘छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण’, वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगाव, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर उतेखोल या रायगड विभागातील सहा शाळांचा एकत्रीकरण मेळावा वनवासी कल्याण आश्रमशाळा माणगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडला. ज्ञानरचनावादी दृष्टिकोन ठेवून अध्ययन अध्यापनात नवनवीन प्रयोग करणार्या सर्व शिक्षकांचा प्रतिवर्षीप्रमाणे एकत्रीकरणाचा मेळावा संपन्न झाला. छत्रपती शिक्षण मंडळाच्या रायगड जिल्ह्यातील माध्यमिक विद्यामंदिर रातवड, अभिनव ज्ञानमंदिर उसर खुर्द, सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे, जय जवान जय किसान विद्यालय वाघेरी , वनवासी कल्याण आश्रम शाळा माणगाव व आदर्श प्राथमिक विद्यामंदिर उतेखोल ह्या सहा शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी या एकत्रिकरणात सहभागी झाले.
या एकत्रीकरनात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी प्राध्यापक मिलिंद मराठे यांनी मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरणाची व्याप्ती, शिक्षकांनी करावयाची तयारी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. वनवासी कल्याण आश्रमाची माहिती प्रांत सचिव महेश देशपांडे यांनी दिली. पर्यावरण संरक्षण याविषयी अशोक चाळके यांनी तसेच ललित सारंग यांनी विविध कार्यक्रमांची व रा.स्व. संघ वर्षाची माहिती देऊन मार्गदर्शन केले. समारोपीय सत्रात डॉ. निलेश रेवगडे यांनी मार्गदर्शन केले. या एकत्रीकरणात प्राध्यापक मिलिंद मराठे, महेश देशपांडे, अशोक चालके, ललित सारंग, डॉ. निलेश रेवगडे, महादेव जाधव, नितीन चांदोरकर, लक्ष्मण जंगम, किशोर आल्हाड, मिलिंद कुलकर्णी, सर्व शाळांचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.