। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील ठाणाळे येथील एका 35 वर्षीय तरुणाने बुधवारी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुधागड तालुक्यातील ठाणाळे येथील संदीप विठ्ठल फाटे (वय 35) हा तरुण मंगळवारी (ता.10) मी शेतात जाऊन फेरी मारून येतो असे घरी सांगून गेला, तो रात्री परत आला नाही. म्हणून त्याचा गावात व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता तो तेथेही सापडला नाही. बुधवारी सकाळी 6 वाजल्याचे सुमारास गावातील व्यक्तीस एका शेताजवळील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत संदीपचा मृतदेह आढळून आला. या घटनेची पाली पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षार्थी पोलीस उपनिरीक्षक एल.एन. सरगर हे करीत आहेत.