आजारपणाला कंटाळून त्याने घेतला टोकाचा निर्णय

महाड एमआयडीसी हद्दीत दारू पिऊन आत्महत्येचे वाढते प्रमाण
| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावातील एका 49 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. सविस्तर माहिती अशी की, मयत शिवाजी गजानन देशमुख उर्फ लाला हे सतत पायाच्या आजारामुळे त्रस्त होते. अनेक उपचार करून देखील आजार बरा होत नसल्यामुळे अखेर शिवाजी देशमुख यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.

दिनांक 10 मे रोजी सायंकाळच्या सुमारास मयत शिवाजी देशमुख यांनी आपल्या राहत्या घराच्या पडवीतील वाशाला टॉवेल बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे. याबाबत महाड एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सदरचा मृत्यूदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवाविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला.

महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दीपक ढेपे हे करीत आहेत.

Exit mobile version