अंगावर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

। मुंबई । वृत्तसंस्था ।

साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख वय ४५ हे शेती विषयक प्रश्नांची मागणी करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

विधान भवन परिसरातील आत्मदहन प्रकरणावर सभागृहात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही या प्रकरणाची माहिती घेतली असून संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच त्याला सर्व मदत केली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.

ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. १८ लाख हेक्टर नुकसान झालंय. त्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करायला पाहिजे होते. मजुराला एकरकमी मदत करण्याची मागणी केली होती, पण तीही विचारात घेतली नाही. असा आरोप अजित पवारांनी केला आहे.

Exit mobile version