ग्रामस्थांच्या सतकर्तेमुळे मोठी दुर्घटना टळली
। खोपोली । प्रतिनिधी ।
लौजी गावाच्या परिसरात शेतातील सुकलेल्या गवताच्या माळाला अचानक आग लाग लागली. वार्यामुळे मोठ्या प्रमाणात आगीचे डोंब दिसू लागले. ग्रामस्थांनी सतकर्ता दाखवत अग्निशमन दलाला बोलवत मदतकार्य केल्यामुळे मोठी दुर्गघटना टळली आहे. ग्रामस्थ, तरुणांनी दाखविलेल्या धाडसाचे पालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी कौतुक करीत आभार व्यक्त केले आहे.
खोपोली शहरात काही दिवसांपसून कडाक्याच्या थंडीबरोबर जोरदार वारा येत आहे रविवारी सकाळी मस्को कारखान्याच्या संरक्षक भिंतीच्या मागच्या बाजूने छोटीशी आग लागली होती. मात्र, वार्याने ती पसरत चिंचवली गावच्या दिशेने गेली आणि तिने भयाण रूप धारण केले. चिंचवली ग्रामस्थ संतोष शेवाळे यांना ती आग दिसल्यानंतर त्यांनी खोपोली अग्निशामक दलास दूरध्वनीवरून कळविले, काही मिनिटातच अग्निशामक दल दाखल झाला, तत्पूर्वी लौजी गावातील तरुण मंडळी घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचा प्रारंभही केला होता, मात्र अग्निशामक दलाने पाण्याच्या जोरदार फवार्याने आगीवर नियंत्रण मिळविले.