| पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये शहरात चार ठिकाणी लाखो रुपये किमतीचे दागिने लुटण्यात आले असून या प्रकारांना आळा घालण्यात पोलिसांनाही अपयश आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
नेरूळमधील शिरवणे गाव येथे राहणारे मिलिंद पाईकराव घराजवळ असलेल्या राजमहल हॉटेलजवळ फोनवर बोलत असताना पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाची 35 हजारांची सोन्याची चैन खेचून पलायन केले. अशाच प्रकारची घटना कळंबोली सेक्टर-8 मध्ये राहणार्या प्रभावती राजे (42) या यांच्यासोबत घडली असून वडापावचा स्टॉल बंद करून घरी परतत असताना त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे 12 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र खेचण्यात आले आहे; तर कोपरखैरणे सेक्टर-18 मध्ये राहणार्या मंजुळा सुन्नाळ मॉर्निंग वॉकसाठी गेल्या असताना सेक्टर-23 मधील जामा मस्जीदजवळील त्यांच्या गळ्यातील 70 हजारांची सोन्याची चैन खेचण्यात आली आहे. अशाच प्रकारे ठाण्यातील विटावा येथे राहणार्या रंजना कोकाटे यांच्या गळ्यातील 87 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरण्यात आले आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलिस हद्दीतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ
![](https://krushival.in/grygrars/2023/03/krushival-e1683194005956-1024x534.jpg)