कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण तालुक्यात सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या बळावली आहे. त्यात मोठी जुई गावातील 22 रहिवाशांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. माई पाटील या चिमुकल्या मुलीला चावलेल्या कुत्र्यामुळे तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. कुत्र्यांच्या उच्छादामुळे मोठी जुई गावातील रहिवासी सध्या भीतीच्या सावटाखाली आपले जीवन जगत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तरी अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उरण पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सध्या रहिवासी करत आहेत.

Exit mobile version