। उरण । प्रतिनिधी ।
गोवा पर्यटन विभागाने ओटीएम मुंबई 2024 मध्ये पुनर्संचयित पर्यटनासाठी ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट अवॉर्ड’ अर्थात सर्वोत्तम नाविन्यपूर्ण उत्पादन पुरस्कार जिंकला. राजस्थान सरकारच्या उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री दिया कुमारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जबाबदार आणि शाश्वत पद्धतींवर लक्ष केंद्रित करणार्या पुनर्संचयित पर्यटनाला चालना देण्याच्या गोव्याच्या प्रमुख भूमिकेवर शिक्कामोर्तब करणारा हा पुरस्कार आहे.
गोव्याचा ‘एकादश तीर्थ’ उपक्रम अध्यात्म, स्थानिक संस्कृती, राष्ट्रवाद आणि जागरूक पर्यटन एकत्र आणतो. वारसा जतन करणे, उत्साही सणांचे आयोजन करणे, साहसी उपक्रम राबवणे, संमेलने आणि कार्यक्रमांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी गोव्याचे प्रयत्न अधोरेखित झाले. यावरून गोव्याच्या शाश्वततेची बांधिलकी दिसून येते.
या पुरस्काराने गोव्याला पुनर्संचयित पर्यटनात अग्रेसर म्हणून प्रस्थापित केले आहे. गोव्याच्या पर्यटन उद्योगासाठी ही एक महत्त्वाची कामगिरी आहे.