सावधान! पुन्हा पावसाचा इशारा

मुंबई | प्रतिनिधी |
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्राचा प्रभाव निर्माण झाल्याने मुंबईसह महाराष्ट्रात रविवारपासून पुढील चार दिवसात पाऊस पडण्याची शक्यता मध्यवर्ती हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टी पासून दूर गेलं आहे. यानंतर आता अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभं ठाकलं आहे. या ठिकाणी देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता वाढणार आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

Exit mobile version