। रसायनी । वार्ताहर।
राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल-चौधरी यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक मुद्यांवर आधारीत चरणबद्ध आंदोलन केले जात आहे. यापूर्वी धरणे आंदोलन आणि रॅली प्रदर्शन करण्यात आले असून, त्याआधारे दिनांक 25 मे 2022 रोजी भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील विविध संघटनांनी भारत बंदला पाठिंबा व सक्रिय सहभाग दर्शविला आहे. तरी सर्व नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाद्वारे मनोज रामधरणे, प्रवीण पाटील, सुधीर मुक्षे, मधुकर म्हात्रे, मनोज महाले यांनी केला आहे.