। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! आज दि. २८ दुपारी चार वाजेपर्यंत मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण हॉटेल ताज येथे व्हीआयपी पाहुणे येणार असल्याने दुपारी चार वाजेपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. तरी ह्या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पोलिसांनी आमच्या प्रतिनिधीकडे अधिक चौकशी दरम्यान सांगितले आहे. तरी ह्या ठिकाणावरून मांडवा-अलिबाग व जेएनपिटीकडे जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेले नाही.
बिग ब्रेकींग न्यूज! मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण दुपारी चार वाजेपर्यंत बंद
![](https://krushival.in/grygrars/2022/10/WhatsApp-Image-2022-10-28-at-1.11.10-PM-1024x768.jpeg)