। मुंबई । वार्ताहर ।
मान्सूनने नियोजित तारखेच्या दोन दिवस आधीच वायव्य भारत व्यापला आहे. रविवारी ५ जून महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी भारतात मान्सून ५ जूनच्या सुमारास दाखल होतो. मात्र यंदा ३ जून रोजी म्हणजे नियोजित तारखेला दोन दिवस आधीच त्याने वायव्य भारत व्यापला.
मान्सून महाराष्ट्राच्या किनारपटीजवळ आला असून ५ जूनपर्यंत तो तळकोकणात व त्यापुढे तीन ते चार दिवसात संपूर्ण राज्यात येईल, असा अंदाज आहे. तर राज्यात ४ ते ५ जुंनरम्यान मोसमी पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र आता ६ व ७ राज्यातील कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, बीड, नांदेड या भागात मुसळधार पावसाचा नवा अंदाज हवामान विभागाने ३ जून रोजी दिला आहे.