पश्‍चिम बंगालमध्ये जळीतकांड

नेत्याच्या हत्येनंतर 12 घरे पेटवली, 10 ठार
। कोलकाता । वृत्तसंस्था ।

बंगालमधील बीरभूममध्ये तृणमुल नेत्याच्या हत्येनंतर सोमवारी रात्री मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या जमावाने 10-12 घरांचे दरवाजे बंद करून आग लावली. या घटनेत एकाच घरातून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या भयंकर हिंसाचारानंतर पश्‍चिम बंगाल सरकारने घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. रामपुरहाटमध्ये टीएमसी उपाध्यक्षाच्या हत्येनंतर बदला घेण्यासाठी ही घटना घडवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हिंसाचारानंतर घटनेची माहिती मिळताच डीएमसह बीरभूमचे सर्व बडे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Exit mobile version